Saturday, January 15, 2011

खर्डेघाशी : इष्टार्ट !!!!

दिसामाजी काहीतरी खर्डावे..नाही लिहावे असे रामदास स्वामी म्हणून (लिहून ) गेले. मला  ही लेखनाची खुप आवड होती. म्हणजे शालेत असताना मी वर्गातल्या फल्यावर सुविचार लिहायचो. (त्यांमागे प्रथानेला बाहेर उभे रहायला लागायचे नहीं हा स्वार्थ होता ही गोष्ट निराळी) नंतर कधीतरी अचानक (हो अचानकच) कविता करायला लागलो. ( इथे अचानक हा शब्द योग्य वाटतो कारन जसे लक्ख उन पडलेले असताना अचानक ढग जामुन पाउस पडतो तसा मी अगदी ढग ही न जमता अचानक कविता करायला लागलो) पण तय सोडून इंजीनियरिंगच्या चार वर्षात जर्नल सोडून काही लिहिले नाही. (म्हणजे साहित्य वैगेरे ज्याला म्हणतात तसले काही, आणि इंजीनियरिंग चे जर्नल साहित्य प्रकारात नक्कीच मोड़त नसावे नाही तर एकत्र बायन्डिंग केल्यास चार वर्षात प्रत्येक इंजिनियर च्या जर्नल्स्च्या  चार पाच कादंबर्या सहजच होऊ शकतील ) तर असो ही सगळी पार्श्वभूमी देण्यास कारण की ( हे पत्रास कारण की प्रमाणे वाचावे) आता मी सिरियसली लिहायचे ठरवले आहे ( सिरियस व्हायचे नाही ) . स्पष्टच सांगायचे तर याला खर्डेघाशी म्हणणे योग्य ठरेल .म्हणजे कथा कादंबर्या वैगेरे निवांत लिहीनच पण त्याआधी  पुलंनी लिहिल्या प्रमाणे नव साहित्यिकसाठी आत्मपरिचय लिहिणे महत्वाचे ठरते . आत्मपरिचय तयार पाहिजे . मार्गदर्शन पर पुलंचे 'ललित आत्मपरिचय कसे लिहावे : एक मार्गदर्शन ' वाचलेले आहेच. आणि त्यातले उद्धट पणा हा दुर्गूण नसून आत्म प्रकति करणाचे ठळक वैशिष्ट आहे हे मला मनापासून पटले आहे . तर असो आत्म परिचयपर एक दोन ओळी आता यायलाच हव्यात. लिहितो . तर मी पद्धतशीर लेखक नाही, कलाकार तर त्याहून  नाही.  मी उथळ आहे. आणि म्हणुनच माझ्या खर्डेघाशीत काही खोलवर दडलेला अर्थ वैगेरे शोधण्याचा प्रयत्न फोल ठरावा . पोटासाठी लिहिणारे काहीजण असतात , पोट तिडकीने लिहिणारे अनेक जण  असतात , मी पोट भरलेले आहे म्हणून लिहिणारा आहे हे कृपया सयंमशील वाचकांनी ( म्हणजे इथे पर्यंत वाचत कोणी पोचले असल्यास , किंवा इथे पर्यंत 'वाचून' कोणी 'वाचले' असल्यास) लक्षात घ्यावे . तर मी के लिहायचे हे अद्याप ठरवले नाही पण माझे जनरल नॉलेज तसे जनरलच असल्याने आणि फेसबुक वरील स्टेटस सोडून हल्ली लोक काय लिहितात  ते मी वाचत नसल्याने माझी खर्डेघाशी एकतर कालाच्या मागे असेल किंवा कलायच्या पलीकडील असेल हे मात्र नक्की ....!!!  
       आवडते लेखक : सचिन गिरी आणि बर्नाड श्वा
       नावडते लेखक : लक्ष्मीकान्त बोंगले आणि टोलस्टोय
      आवडते लोक : फेसबुक वरील माझे स्टेटस लाइक करणारे

 --- अनामि'क'  ( या नावाने लिहायचे ठरवले आहे. किंवा आता 'लिहिले आहे'.)  

Thursday, December 3, 2009

"नंग्या तलवारीची अथांग रात्र"

'' त्रुतु बदलतो ,
दुपारच्या उन्हात फ़क्त खारिंची हालचाल...
अनामिक भुताच्या छायेत आणखी एक भयाण रात्र जाते,
एक कोकीळ आणि एक बुलबुल अखंड गात राहतात..
तुम्ही स्वतःलाच सांगता " काही नाही हा एक साधा दिवस आहे,तो ही निघून जाईल"...


कुठल्याशा झाडाच्या वाळलेल्या फांदीवर उमललेल्या
नविन गुलाबी केशरी अंकुराकडे तुम्ही आश्चर्याने पाहता ,
आपली पोकळ पाने पसरून एक काटेरी झुडूपही उभं असतं...
त्याची लाल मखमली पाने काटेरी पलंगावर विसावली असतात;
आणि अचानक तुमच्या यातनांच्या गावातून रक्त वाहतं ...
बेढब आच्छादालेल आपल आयुष्य तिथेच थांबत ...
धुराचे स्तंभ सैतानी आगीसकट आकाशाला स्पर्श करतात ....


तुम्ही जे घेऊ शकता ते घ्या,
वस्तू..
नरकाचे अवशेष..
तुमच्या नसलेल्या गोष्टींनी तुमची झोळी भरून घ्या;
त्या वस्तूंना स्मृतींशी जोडा..
आणि कसे ? कसे आपण या लुटी सोबत जगणार आहोत ?
याची पूर्ती विनाशात होणार आहे.


आपण का म्हणून भ्यायचं ?
तलवार,भाले,बंदुकांचे आवाज,माणसांच्या पावलांची धावपळ,तुम्ही शेवटची कधी ऐकली होती ?
आयुष्याचे पुस्तक पायाखाली तुडवण्याचा आवाज तुम्ही ऐकला होता?
काय तलवार आणि भाल्यांना स्वताःच आवाज असतो ?
तुम्ही ऐकलं होतं त्यांना,जवळ येताना ?
दहा,शंभर,हजारो...
विजयाच्या जल्लोषात का पराभवाच्या आक्रोशात ?
मृत्यु आणि हानी चे आक्रोश ...
का फ़क्त रडणं होतं ते ?
तीक्ष्ण दगडांवरून आणि फुटलेल्या काचांवरून जड़ पावलांनी अलगद जाणं होतं ते .


कळपातील प्राण्यांचे प्रतिबंध आम्ही मोडले...
पंखांशिवाय फडफडताहेत पक्षी,
तुम्हाला किती मिळाले ?
घरी घेउन जा त्यांना, दोन किंवा वीस...
उलटे लटकवा,पाय बांधा, लोंबकळणाऱ्या स्थितीत.
रक्ताने माखलेल्या हातांनी त्यांचे तुकडे करा आणि पिसांच्या ढगांनी ,केसांच्या, खुरांच्या कानांच्या झुबक्यांनी आणि गुदमरलेल्या किंचाळीने आसमंत भरून टाका...
मंद आचेवर निवांत शिजवा; रात्र मोठी आहे,
तलवारी अजुन नंग्याच आहेत...


आवडती नक्षीदार साड़ी ,धूळीत चुरगळते,राख होते..
कोपरया कोपऱ्यात मन भरकटते,जाण अजाण ठिकाणांतुन...
आणि एक अश्रू धुराची नळकांडी तुमच्या पायाशी येऊन पड़ते...
तुम्हाला मृत्युच्या भीतीने ग्रासून टाकते,
चेहरा काचेसारखा तडकतो,
बंदुकीच्या गोळीसारखं ठळक काहीतरी आवाज करत वेगानं जातं,
का अँसिडची बाटली होती ती ?
पेट्रोलचा कँन ?
पेटवलेली काडी ?
अश्रुंनी डोळ्यांना दंश केलेला तुम्हाला जाणवतो ?


आगीच्या कारंज्याप्रमाणे पेटायला तयार, तुमचं रक्त पेट्रोल प्रमाणे भासतं.
गंध म्हणजे काय तुम्ही विसरलाय...
गंध आयुष्याचा,
गंध प्रेमाचा..
घरं भट्टीसारखी जळतात आणि सिलेंडर फटाक्यांसारखे फुटतात,
तुम्ही विचार करता कोणत्या बेकरीत तुम्ही शेवटचा ताज्या भाजलेल्या पावाचा वास घेतला होता ?
कधी फुलांचा सुवास घेतला होता ?
शेवटचे कधी तुम्ही निर्भयपणे चालला होता ?
कधी विचार केला होता तुम्ही मृत्यूचा,आपत्तिचा, अंत्यवीधिचा ?


शहरातील ओळखीच्या गल्लीतून मन फिरत राहतं,
कधी हे घेत तर ते सोडून देत ...
राखेच्या ढीगारयापासून लांब जातं आणि स्वतःशीच विचार करतं,
काय अर्थ आहे स्वातंत्र्याचा ?
सौंदर्य म्हणजे काय?
घर म्हणजे ??
मृत्यूच्या छायेत बंदुकीच्या धाकाने रिकाम्या गल्लीतून नीरव शांतता फडफडत राहते भेदरलेल्या पक्षासारखी ..."


- लेखक : कौस्तुभ म. कुलकर्णी
संपर्क : 09420455688
स्वैरअनुवाद ( लॉन्ग नाईट ऑफ़ अन्शीथ स्वार्ड- एस्थेर डेविड)